मुंबई-हरिद्वार-हिमायल! चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीकडून ‘एसी थ्री टायर’ तिकीट बूक

मुंबई | संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (kolhapur Bypoll Result) आता समोर आला आहे. जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत जाधव यांचा दारूण पराभव केला.

कोल्हापूरात हारतो तर हिमालयात निघून जाईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता भाजपचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या या वक्तव्याची खिल्ली उडावली जात आहे.

अशातच आता राष्ट्रवादीने तर कहरच केल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादीने थेट चंद्रकांत पाटलांसाठी तिकीट बूक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देताना हरिद्वारचे तिकिट काढून दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं. त्यानंतर हरिद्वार ते हिमालय खेचर सेवा मिळण्यासाठी बोलणी देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांसाठी एसी थ्री टायर तिकीट बुक केलं आहे. हा पराभव चंद्रकांत पाटलांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाईल”

kolhapur Bypoll Result: पराभवानंतर सत्यजीत कदम यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

“चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का?”, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा म्हणाले…

“TV वर येत एकजण नाचतोय, बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना”

‘मी पोहोचलो रे हिमालयात, नको परत या….’; राष्ट्रवादीने चंद्रकांत  पाटलांना डिवचलं