“…तर चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाईल”

पुणे | पराभव हा पराभवच असतो… मग तो एका मताने केला काय अन् हजार मतांनी केला काय, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून निवडणुकीला उभं राहण्याची ही संधी होती, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

पराभव झाला तर हिमालयात जाईन असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, असा खोचक टोला देखील जयंत पाटलांनी लगावला आहे.

मला देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. मीही जाईन. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत, असंही मिश्कील टिपण्णी जयंत पाटलांनी केली आहे.

या निकालातून भाजपला चपराक मिळाली आहे आणि महाविकास आघाडीच्या कामाचा विजय झालाय, असंही जयंत पाटील म्हणाले आहे. राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही खंबीर आहोत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, आज लागलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निकालात माविआच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा दणदणीत पराभव करत विधानसभेत एन्ट्री मारली आहे. त्यानंतर जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना टोले लगावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

kolhapur Bypoll Result: पराभवानंतर सत्यजीत कदम यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

“चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का?”, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा म्हणाले…

“TV वर येत एकजण नाचतोय, बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना”

‘मी पोहोचलो रे हिमालयात, नको परत या….’; राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

उत्तर कोल्हापूरात इतिहास घडणार, गेल्या 50 वर्षांत जे झालं नाही ते होणार!