जेटलींच्या जाण्याने भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन झालं आहे. आज 12 वाजून 7 मिनीटांनी त्यांनी नवी दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

6 ऑगस्ट रोजी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सुषमा स्वराज यांच्या निधनावेळी भाजपला राज्यात सुरू असलेली यात्रा स्थगित करावी लागली होती. आता जेटलींच्या जाण्याने भाजपने पुन्हा एकदा यात्रा स्थगित केली आहे.

स्वराज यांना जाऊन महिनाही उलटला नाही तोवरच जेटली काळाच्या पडद्याआड गेले आहेत. भाजपत मोठी अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, अरूण जेटली यांच्यावर रविवारी दुपारी 2. 30 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याअगोदर त्यांचं पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी अन् त्यानंतर भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-