कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा; महंत परमहंस यांचा अजब दावा

नवी दिल्ली |  कोरोना व्हायरसने जगभरात हातपाय सपरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचे भारतात देखील 28 रूग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. मात्र ज्यावेळी सगळं काही हाताबाहेर जातं तिथं विज्ञान नाही तर अध्यात्म उपयोगाला येतं. कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा, असा अजब दावा महंत परमहंस यांनी केला आहे.

परमहंस हे तपस्वी छावणीचे महंत आहेत. देशाचं संरक्षण व्हावं आणि जगातून कोरोना व्हायरस नष्ट व्हावा, यासाठी महंत परमहंस यांनी ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’-जय श्रीराम महायज्ञ केला आहे.

सतत ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्यास कोरोना व्हायरस नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला आहे. वैदिक मंत्रांच्या सहाय्याने कोरोनाला आपण अलविदा करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे बॅक्टेरिया, किटाणू जय श्रीरामच्या जयघोषणाने नष्ट होतील, असाही अजब दावा त्यांनी केला आहे.

दुसरीकडे शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येऊ शकतो, असा अजब दावा भाजपच्या आमदार सुमन हरिप्रिया यांनी केला आहे. शेण आणि गोमूत्रामुळे कर्करोगासारखे अनेक आजार बरे झाले असल्याचाही दावा सुमन यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनात सतत शारिरीक संबंधाचे विचार येणं ही समस्या?

-हे सरकार नक्की चालवतंय कोण?? मुस्लिम आरक्षणावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-“कोण अमृता फडणवीस? त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

-“अहो, तुम्ही सत्तेसाठी किती हापापलेले आहात हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

-निर्भया प्रकरण: आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली