मुंबई : ‘मीटू’ चळवळीअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या कलाकारांसोबत काम न करण्याच्या निर्णयावरुन यूटर्न घेणारा अभिनेता आमीर खानवर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चांगलीच आगपाखड केली आहे.
दिग्दर्शक सुभाष कपूरवर अन्याय झाल्याच्या भावना वाटतात, मग माझ्याविषयी कळवळा नाही का?, असा सवाल तनुश्रीने विचारला आहे.
गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोगल’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुभाष कपूरवर ‘मीटू’ चळवळी अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने घेतला होता.
माझ्या कृत्यामुळे नकळतपणे एका व्यक्तीने आपला उपजीविका मिळवण्याचा हक्क गमावला आहे. हे विचार सतत माझ्या मनात यायचे. त्याच्या मनातील पश्चातापदग्ध भावनांविषयी मला कल्पनाही नसेल, असं वाटून रात्ररात्रभर मला झोप यायची नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय मी मागे घेत आहे, असं स्पष्टीकरण आमीर खानने दिलं होतं.
आमीरने आपल्या निर्णयावरुन घूमजाव केल्यामुळे तनुश्री दत्ता चांगलीच भडकली.
एखादी महिला जेव्हा अत्याचाराला बळी पडते आणि या धक्क्यामुळे चित्रपटात काम करु शकत नाही, तेव्हा बॉलिवूडमधील कोणाचीच झोप कशी उडत नाही?, असा सवाल तनुश्रीने उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतराला राष्ट्रवादीच जबाबदार आहे”- https://t.co/KySCd7WVD5 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
‘या’ अटींमुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर!- https://t.co/5u0rorqQhN #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
आढळरावांच्या त्या टीकेला अमोल कोल्हेंचं खरमरीत प्रत्युत्तर!- https://t.co/aZNTrskW6V #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019