“उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठी बाणा विसरले”

मुंबई | उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठी बाणा विसरले असून आता ते इतिहास सुद्धा विसरायला सांगतायेत, अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान विसरले असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा इतिहास सांगण्याची हिच ती वेळ आहे. गर्व से कहो हम हिंदू है, असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना-भाजप यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्द्यावरून टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

 

महत्वाच्या बातम्या- 

-गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

-“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

-“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी

-पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे