राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

मुंबई | बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करू नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

परिवहन विभागाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे, अशी टीका राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे. तसेच बेस्ट परिवहनाचा तोटा महापालिकेने भरावा, वीज विभागाचा नफा परिवहनाला देऊ नये, असे आदेश देण्याची मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.

परिवहन विभागाला कोणत्याही प्रकारे कर सवलत, अनुदान किंवा टोलमाफी न देण्याची भूमिका आहे. तसेच मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात बेस्टचा परिवहन विभाग विलीन करण्याचे आश्वासन न पाळल्याने विभागाचा तोटा वाढत चालला आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही. यासाठी विद्युत नियामक आयोगाने ठेवलेल्या सुनावणीवेळी विस्तृत बाजू मांडण्यासाठी योग्य कागदपत्रांसह पक्षाचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Mns11

महत्वाच्या बातम्या- 

-रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी

-“मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार”

-“अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय”

-सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

-हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप.