“लबाड लांडगा ढोंग करतोय, निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय”

मुंबई | औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यांना पुन्हा एकदा फटकारलं होतं. आज नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आपली प्रतिक्रिया दिली.

लबाड लांडगा ढोंग करतोय निर्णय घ्यायचं म्हटलं की सोंग करतोय. तसेच शून्य निर्णयक्षमता असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेतून जनतेला काय मिळालं तर भोपळा. आज वाटले होते ठाकरे संभाजीनगरचा पाणी प्रश्न मिटवतील पण त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. नंतर वाटलं औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करतील पण त्यावरही निर्णय घेतला नाही. सरदारच लबाड असल्यामुळे शिवसेना ‘लबाड सेना’ बनलीय, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

दरम्यान, औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं आहे.

आधी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा कधी वाचणार? ज्या दिवशी मुख्यमंत्री हनुमान चालीसा वाचणार, त्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू, असं प्रति आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

हनुमान चालिसा पठण केल्यामुळे आमच्यावर राजद्रोहा सारखा गुन्हा दाखल केला. हा कलंक दूर करण्यासाठी दुग्धाभिषेक आम्ही केलाय. पण तुमच्या पापाचा घडा भरत आलाय. तुम्ही केलेलं पाप गंगेत न्हाहूनही धुतलं जाणार नाही, अशी टीकाही त्यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…” 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार 

“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे