मुंबई | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क सोशल मीडियालाच रामराम करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्वत:च यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी काहीशा सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर विरोधी पक्षांनी मात्र मोदींच्या निर्णयावर काडाडून प्रहार केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून मोदींना टोला लगावला आहे.
काही भाजप नेत्यांनी मोदींनी जर सोशल मीडिया सोडला तर आपण देखील सोशल मीडिया सोडू, असा पवित्रा घेतला आहे. त्यावर नवाब मलिक म्हणाले, “सगळ्या मोदी भक्तांनी जर सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल”, असा खोटक टोला त्यांनी लगावला आहे.
मोदीजी जर सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा निर्णय देशहिताचा असेल आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू, अशी कोपरखळीही मलिक यांनी मारली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मोदींच्या या ट्वीटवर जास्त काही बोलण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांच्या निर्णयावर आपण काही बोलण्यास आता योग्य वेळ नाही. रविवारी ते आपल्या सगळ्यांना जे काही सांगायचं आहे ते सांगतील, असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री ट्वीट करत सर्वांना धक्का दिला. येत्या काही दिवसांत मी सोशल मीडियाची माझी अकाउंट्स बंद करण्याचा विचार करतोय, असं ट्वीट मोदींनी केलं. त्यानंतर ट्वीटवर कमेंटला महापूर आला आहे. मोदींच्या या निर्णयानंतर अनेक लोकांनी भावूक होत #NoSir असा हॅशटॅग ट्रेंड करत आपण असा निर्णय घेऊ नका, असं आवाहन केलं आहे.
तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडिया हे चांगलं माध्यम वाटतं. कृपया आपण असा निर्णय घेऊ नका, अशी विनंती एका नेटकऱ्याने मोदींना केली आहे. तर फक्त तुमच्यामुळे मी ट्वीटर वापरायला सुरूवात केली आहे. आपण सोशल मीडिया सोडू नका, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
शूरवीर सेनानी कधी रणांगण सोडत नाहीत. शेवटपर्यंत संघर्ष करतात. खलनायकांना कधीही जिंकू देऊ नका, असं ट्वीट पायल रोहतगीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. मोदी यांची सोशल मीडियात जोरदार क्रेझ आहे. त्यांच्या फेसबुक पेजला 4 कोटी 47 लाख फाॅलोवर्स आहेत तर ट्विटरवर त्यांना 5 कोटी 33 लाख लोक फाॅलो करत आहेत.
जगभरात मोठ्या प्रमाणात फॅन फोलोअर्स असणाऱ्या मोदींच्या मनात हा विचार नेमका का आला? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.
कल मोदी जी ने सोशल मीडिया रविवार से छोड़ने के संकेत दिए हैं कुछ नेता भी छोड़ने की बात कर रहे हैं अगर सारे भक्तों ने छोड़ दिया तो देश शांत हो जाए गा,
मोदी जी का फैसला देश हित में होगा हम स्वागत करते हैं मोदी जी फैसला लें। #ModiQuitsSocialMedia— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 3, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-मुस्लिम आरक्षणावर विश्व हिंदू परिषदेने डोळे वटारताच सेनेचा वाघ शांत!
-…म्हणून अरविंद केजरीवाल घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!; भेटीकडे साऱ्यांचं लक्ष
-नातू हवा म्हणून सूनेचा छळ; राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
-पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ट्वीटनंतर नेटकरी भावूक; हजारो लोक म्हणाले #NoSir
-मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर मिसेस फडणवीसांचं ट्वीट; म्हणतात…