‘हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची…’; नवाब मलिकांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केला आहे. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होईल, असं नवाब मलिक म्हणालेत.

गेल्या महिन्याभरापूर्वी जी परिस्थिती होती. ती परिस्थिती आता राहिला नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड वानखेडेंना भेटत आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असं मलिक म्हणालेत. तसेच त्यांच्याकडे किती लोकांचे पैसे आहे हे उघड होईल, असं नवाब मलिक म्हणालेत.

विधानसभेचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेत मी जे काही समोर आणणार या राज्यात ते नेते तोंड दाखवू शकणार नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

अधिवेशनात माझं नाव घेऊन हल्ले होतील. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार आहे. मी विषय डायव्हर्ट करावा म्हणून प्रयत्न होईल. पण मी कुणाचं नाव घेऊन मी विषय डायव्हर्ट करणार नाही. पण हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

ड्रग्ज पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी, ड्रग्ज रॅकेट चोलवतो. त्याला अटक का केली नाही?. ज्याने पार्टी आयोजित केली होती. त्याला सोडून कसं दिलं जाऊ शकतं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?

“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”