“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना”

मुंबई | आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचं समजलं आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे म्हणालेत. तसेच उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी बोलताना केलीये.

महाविकास आघाडी सरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख (anil deshmukh) हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक (nawab malik) मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का?, असा सवाल आम्ही उपस्थित केलाय असं त्यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला ते हिंदू असल्यामुळे तर नवाब मलिकांचा राजीनामा हे मुस्लिम असल्यामुळे घेऊ शकत नाही, असं वक्तव्य राणे बंधुकडून करण्यात आलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांच्याकडून मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये राणे बंधुच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत राणे बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्ष शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे पोलिसांना काय जबाब देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार” 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही” 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली”