“जनतेने राहुल गांधींना पराभवाची धूळ चारलीये पण आरोप करण्याची हौस आणखी फिटली नाही”

नवी दिल्ली | जनतेने राहुल गांधींना पराभवाची धूळ चारलीये पण त्यांची आरोप करण्याची हौस आणखी फिटली नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी आणि त्यानंतर केंद्र सरकारवर आरोप करावेत, असा टोला देखील त्यांनी राहुल यांना लगावलाय. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीतली वरकड रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. हा निर्णय आरबीआयकडून चोरी करण्यासारखाच आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

देशात छोट्या-मोठ्या, मायक्रो-मिनी प्रकारचे उद्योजक असतील तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे. इतकंच नाही तर सगळ्यांना त्यांचा व्यवसाय कोणतीही अडचण न येता कसा सुरु ठेवता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-