मुंबई | मुख्यमंत्री म्हणून नाही तर उद्धव ठाकरेंनी राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्यातील जनतेची काळजी घेतली. राजकीय निर्णयावर सर्व टाळ्या वाजवतील. मात्र त्यांनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली. त्यांचं काम इतिहासात नोंदवलं जाईल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा दिवस रात्र या लढाईत बिन्नीच्या शिलेदाराची भूमिका बजावली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
जगात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना भारताने बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लढाईला भावनिक टच दिला आहे, पण आपण हे युद्ध म्हणून देखील पाहात आहोत, असंही संजय राऊत यांनी यावेळी मान्य केलं.
महत्वाच्या बातम्या –
-मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प; राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन
-कोरोनाच्या संदर्भात कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी मोदींना केली ही सूचना
-“…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा”
-जनता कर्फ्यु’च्या दिवशी सर्वच रेल्वे बंद राहणार का?
-महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर