नवी दिल्ली | चिनी सैनिकांच्या गलवान खोऱ्यातील घुसखोरीनंतर भारत चीन दरम्यान तणावाचं वातावरण तयार झालं आहे. भारत चीनमध्ये तणावाचं वातावरण असतानाच आता भारत पाकिस्तान सीमेवर हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेजवळच जम्मू काश्मीरमध्ये बीएसएफ जवानांना एक भूमीगत भुयार सापडलं आहे.
नेहमीप्रमाणे गुरुवारी जम्मू मधील सांबा भागात बीएसएफचे जवान पहारा देत होते. यावेळी पहारा देणाऱ्या जवानांना 50 मीटर लांब खोदलेली ही भुयार नजरेस पडली. या भुयाराच्या आत जाण्याच्या मार्गावर 8 ते 10 प्लॅस्टिकच्या गोण्या आढळल्या आहेत. या गोण्यांवर गोण्या तयार केल्याची तारीख तसेच एक्सपायरी डेट सुद्धा आहे. या तारखेवरून या गोण्या नुकत्याच तयार झाल्याचं लक्षात येत आहे. तसेच गोण्यांवर शंकरगढ आणि कराची अशी नावेही आहेत.
भुयारांमध्ये कराचीमध्ये तयार झालेले पाईप आणि बंकरमध्ये असतात तश्या वाळूच्या गोण्याही आढळल्या आहेत. या भुयारांचा शोध लागल्यानंतर बॉर्डरवरील सैनिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
बीएसएफचे सरसंचालक राकेश अस्थाना यांनी सैनिकांना सीमेवरील भागात अशी आणखीही भुयार असू शकतात त्यामुळे सीमाभाग पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सीमावर्ती भागात आणखी भूयारांचे शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
सैनिकांना सापडलेल्या या भुयारापासून 400 मीटर अंतरावरच पाकिस्तान सैन्याचं पोस्ट आहे. हे भुयार पोस्ट पासून खोदत आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या भुयारांमार्गे सशस्त्र सैन्य किंवा दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, भारतीय सीमेला लागून 3300 किमी लांब पाकिस्तान सीमा आहे. सध्या संपूर्ण सीमावर्ती भागात शोधकार्य सुरू आहे. पाकिस्तानचा हा नवा डाव समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय सैन्य कोणतं पाऊल उचलतय याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंच नाव भाजपच्या कोणत्याही नेत्यानं घेतलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
‘मला सुशांतकडून बाळं हवं होतं जे…’; रियाने सुशांतचा आणि तिच्या आई होण्याबाबत केला मोठा खुलासा!
‘मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत केव्हाच…’; रियाचा ‘तो’ दावा अंकिताने खोडला