बीड | पराभव वगैरे चिल्लर गोष्टींनी पंकजा मुंडे खचणारी नाही, असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
एक डिसेंबरला मी फेसबुक पोस्ट लिहिली, गेले बारा दिवस सगळीकडे एकच चर्चा झाली की मी भाजप सोडणार आहे. आधी टीव्ही लावला की संजय राऊत दिसायचे, ते बोलत होते, ते त्यांनी करुन दाखवलं, पण मी काही न बोलताही टीव्ही लावल्यावर दिसायचे, असं त्या म्हणाल्या आहेत.
माझ्याकडे सत्ता नव्हती, अधिकारी नव्हते… फाटक्या लोकांनी माझी संघर्ष यात्रा काढली. छोट्याशा पराभवाने खचणारी पंकजा मुंडे नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. पिता गमावण्यासारखं दुसरं मोठं दु:ख नाही, असं पंकजांनी म्हटलं
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मन मोकळं केलं, मन मोकळं केलं नाही तर शरिरात विष भिनतं. मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का??? – https://t.co/Sf2r6pic20 @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
अयोध्या फेरविचार याचीकेवर आज सुनावणी – https://t.co/UNvvLmocks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
देशाचा विकासदर घटण्याची मला चिंता नाही- प्रणव मुखर्जी – https://t.co/b0OBkYH3B2 @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019