बीड | माझ्या बापाचा पक्ष आहे म्हटलं तर काय चूक आहे… मुठभर लोकांचा पक्ष मुंडे साहेबांनी गावोगावी पोहचवला. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. गोपीनाथगडावर आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानदिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
मूठभर लोकांचा पक्ष मुंडे साहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत नेला. आता रिव्हर्स गिअर नको. पक्षाने विचार करावा. आता पक्षाच्या कोर्टात चेंडू आहे. मी कुठेही जाऊन काहीही होऊ शकते आणि काहीही मिळवू शकते पण माझ्या गनिमेला ते शोभणारं नाहीये, असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यानंतरही एक-एक आमदार जोडण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते, आणि तुम्ही म्हणता मी बंड करणार, कोणाविरोधात करू? माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केल्या.
27 जानेवारीला औरंगाबाद इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार मात्र हे उपोषण कुणाविरोधात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
पराभव वगैरे चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही- पंकजा मुंडे – https://t.co/AYxhnpwWCf @Pankajamunde @BJP4Maharashtra @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का??? – https://t.co/Sf2r6pic20 @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
अयोध्या फेरविचार याचीकेवर आज सुनावणी – https://t.co/UNvvLmocks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019