लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवणं गरजेचं- प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली | लोकसभेतील  खासदारांची संख्या 1000 करणे गरजेचं आहे, तर राज्यसभेतील खासदारांची संख्याही त्याप्रमाणे वाढवणे गरजेचं असल्याचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुचवलं आहे.

सध्या लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा 552 आहे, तर राज्यसभेतील खासदारांची मर्यादा 250 आहे. 2019 च्या निवडणुकांच्या आधारावर सध्या एक खासदार जवळपास 16 लाख लोकांच प्रतिनिधित्व करतं आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

भारताची लोकसंख्या खासदारांच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे एका खासदाराला आधीपेक्षा जास्त लोकांच प्रतिनिधित्व करावं लागत आहे. त्यामुळं खासदारांना अनेक अडचणी येऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे शक्य होत नाही, असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विद्यमान मोदी सरकार नव्या संसद भवन निर्मीतीचा विचार करत आहे. हे नवं संसद भवन 2022 पर्यंत निर्माण करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. त्यामुळे लवकरात लवकर खासदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत, असं मुखर्जी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-