राज ठाकरे म्हणतात…कधी कधी ठोकशाहीने मिळालेला न्याय पण योग्य वाटतो

मुंबई | हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे. काहीजण पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचं कौतुक करत आहेत तर कोणी या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करुन हैदराबाद एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कधी कधी ठोकशाहीने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

तेलंगणामधील सायराबादमध्ये आठवड्याभरापूर्वी एका डॉक्टर तरुणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिची हत्या केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटण्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान, याप्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जण पोलिसांचं कौतुक करत आहेत तर काहीजण मात्र कायद्याला धरून हा न्याय झालेला नाहीये, असं म्हणत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-