गांधीनगर : पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणं थांबवलं नाही, तर या देशाचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असा हल्लाबोल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबीयांचा एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.
काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणं पाकिस्तानला अवघड जात आहे. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही, असं सिंह यांनी सांगितलं आहे.
अन्य कुणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणं थांबवलं नाही, तर पाकचे आपोआप तुकडे होतील, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“दिल्लीमध्ये गडकरी, अमित शहा, सोनिया गांधी आणि पवारांची गुप्त बैठक”- https://t.co/RIey8ICbYj #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
पुण्याच्या प्रवेशद्वारावर पावणे तीन क्विंटलचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत- https://t.co/xfwAVSChm6 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
मला तोंड उघडायला लावू नका, नाही तर…- सुप्रिया सुळे- https://t.co/8IARfyfG7J #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019