राज ठाकरेंच्या आमदाराचं मत कुणाला?; भाजप की महाविकास आघाडी???

मुंबई : आज ठाकरे सरकारचा विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव पार पडला.  169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतं दिली. तर चार आमदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनसेचे आमदार राजू पाटील यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

सकाळी 11 वाजता राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटती. अर्धा पाऊस तास त्यांच्यात चर्चा झाली आणि यानंतर राजू पाटील यांनी विधीमंडळात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

मनसेबरोबर माकप आणि एमआयएम हे पक्ष देखील तटस्थ राहिले. एमआयएमचे धुळ्याचे आमदार शहा फारूख अन्वर आणि मालेगावचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे दोन तर सीपीएमचे विनोद निकोले हे आमदार तटस्थ राहिले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकारचा विश्वास ठराव मतदानाला येताच भाजप आमदारांनी संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. नही चलेगी नही चलेगी…. दादागिरी नहीं चलेगी, अशा घोषणा देत भाजप आमदारांनी सभागृह दणादून सोडलं. तर महाआघाडी सरकारच्या बाजूचं संख्याबळ पाहून भाजप पळून गेलं, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली.

महत्त्वाच्या बातम्या-