राकेश मारियांनी 26\11 हल्ल्यासंदर्भात केला ‘हा’ मोठा खुलासा!

मुंबई |  संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईवरील 26\11 हल्ल्यासंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

26\11 च्या हल्ल्यावेळी मुंबई पोलीस दलातील तुकाराम ओंबळे यांच्या शौर्यामुळे अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. मात्र कसाब ठार झाला असता तर त्याच्यासह इतरांना हिंदू दहशतवादी ठरवण्याची योजना लष्कर-ए-तोयबाने आखली होती.

कसाबला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडे एक बोगस ओळखपत्र मिळालं. यावर समीर चौधरी असं नाव होतं. या ओळखपत्राच्या साहाय्याने मृत दहशतवाद्यांना हिंदू ठरवण्याचा डाव होता. मात्र कसाब जिवंत सापडल्यामुळे हा प्रयत्न फसला, असं राकेश मारिया यांनी म्हटलं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कसाबला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. मुंबईवरील हल्ल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठीच ही सुपारी देण्यात आली होती, असा दावा राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिला मानाचा मुजरा

-छत्रपती शिवरायांचे स्टेटस व्हिडीओ घालतायत सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ!

-…तर इंदोरीकरांच्या तोंडाला आश्रमात जाऊन काळं फासू- तृप्ती देसाई

-कियारा आडवाणीचा टॉपलेस फोटो होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

-20 लाख रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ‘त्या’ पोलिस कर्मचारऱ्याला ठोकल्या बेड्या