मुंबई | बिग बॉस शो कितीही वादग्रस्त असला तरी तितकाच लोकप्रिय देखील आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आला आहे.
सध्या बिग बॉसचा 14वा सिझन सुरू आहे. या सिझनलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीयेत.
बिग बॉसचं 14 वं सिझन आता अंतिम टप्प्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरात राखी सावंतच्या वाईल्ड कार्ड एंट्रीने मनोरंजनाचा डोस डबल झाला आहे.
राखी सावंतने तिच्या पतीसह बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. राखीच्या पतीला बघायला सगळेच प्रेक्षक उत्सुक होते. शोदरम्यान राखी आणि तिचा पती रितेश यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. राखीचा पती तिच्याशी नीट वागत नसल्याने घरातील इतर सदस्यांनीही रितेशला फटकारलं आहे.
रितेशच्या पहिल्या लग्नाबद्दल शोमध्ये खुलासा झाला. रितेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला असला तरी राखी घरात सतत त्याची आठवण काढताना दिसत आहे.
शुक्रवारच्या भागात राखीने शमिता शेट्टीला तिची भीती सांगितली आहे. राखी सावंतने तिच्या मनातली भीती शमिताला मोकळेपणाने सांगितली आहे.
माझा पती मला सोडून तर जाणार नाही ना? असा प्रश्न राखीने शमिताला विचारला आहे. सलमान खानने रितेशला शो दरम्यान चांगलंच फटकालं होतं.
माझ्या सासरच्या लोकांनीही टीव्हीवर सगळा पाहिलं असेल. ते लोकं दूर तर जाणार नाहीत ना, अशी भीती राखीला वाटत आहे. राखीने शमिताला तिची भीती सांगितल्यावर शमिता राखीला तिला समजावून सांगताना दिसली.
रितेश जर खरंच तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो तुझ्यापासून दूर जाणार नाही, असं शमिता राखीला म्हणाली. तर यावेळेस झुकले तर रितेश पुन्हा तसंच वागेल, असंही राखीने बोलून दाखवलं.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाचा हाहाकार! केंद्राने जारी केल्या ‘या’ नव्या गाईडलाईन्स
कझाकीस्तानात तणावाचं वातावरण, सरकारने दिला ‘तो’ हिटलरी हुकूम अन्…
राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर
“हेडमास्तर कुठं गेेले? तो दरारा कुठंय?”, ‘त्या’ कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या
‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल