दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार; आठवलेंचा खळबळजनक आरोप

पंढरपूर | दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा थेट आरोप सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात अनेकांचे जीव गेले आहेत. यात काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी सदस्यांचा हात आहे. काँग्रेसने दिल्ली पेटवली असवल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले असताना दिल्लीमध्ये हिंसाचाराची घटना घडत असेल तर या घटने मागे कोणाचा हात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चर्चा केली. आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावं, अशी मोदी यांची इच्छा आहे. त्यांनी चर्चेवेळी हे मला सांगितलं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांची अवस्था रबराच्या बाहुलीसारखी झाली आहे- रावसाहेब दानवे

-पृथ्वीबाबांच्या निशाण्यावर फडणवीस; समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप

-“ठाकरे सरकार 15 दिवसांत पडेल.. त्यामुळे सेना-भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं”

-दिल्ली पोलिसांनी हातात काय बांगड्या भरल्यात काय?; मशीदीवर भगवा लावल्याने काँग्रेस नेता भडकला

-देशाला गुजरातचं दंगल मॉडेल नकोय; दिल्लीतल्या हिंसाचाराने जयंत पाटील अस्वस्थ