सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’चा बुधवारी रात्री साताऱ्यात प्रवेश झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे गेले काही दिवस पक्षावरील त्यांच्या नाराजीची आणि संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
छत्रपतींचे वारस शिवेंद्रराजे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्यापाठोपाठ विधान परिषदेचे सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांची देखील भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो. यात्रेमध्ये कोण कोण नेते उपस्थित राहणार? याकडे अनेकांचे लक्ष होतं. यामध्ये वरील तीनही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची पक्षावरील नाराजीची आणि त्यांच्या पक्षांतरांची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
पक्षावर नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत या सर्वांचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे पक्षातील काही नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“काश्मीरमध्ये राहत असलेल्या माझ्या सासू-सासऱ्यांसोबत गेल्या 22 दिवसांपासून बोलणं झालं नाही” https://t.co/rUWw47F7zO #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
…म्हणून माझा शिवसेनेला पाठिंबा- जितेंद्र आव्हाड – https://t.co/Bm8px0Dy0d @ShivSena @Awhadspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचं झालं होतं दोनदा लग्न- https://t.co/U6WbHNI2H9 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019