Ranbir Alia Wedding : झालं बरं का…! रणबीर-आलिया अखेर लग्नबंधनात अडकले

मुंबई | फिल्म इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय म्हणून ओळख असलेला अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नाची (Ranbir Alia Wedding) चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अखेर तो दिवस आला आहे जेव्हा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने लग्नगाठ बांधून घेतली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांचे पती-पत्नी बनले. अनेक सिनेकलाकारांच्या उपस्थितीत आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत रणबीर आणि आलियाने सात फेरे घेऊन लग्नगाठ बांधली आहे.

रणबीर आलियाचं लग्न कधी होणार याकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागलं होतं. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता रणबीर आणि आलियाचा लग्नाआधीचा गणेशपूजन संपन्न झाली.

त्यानंतर काल मेंहदी आणि रात्री 8 नंतर संगीतचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

रणबीर आलियाच्या लग्नाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नात आकाश अंबानी देखील उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी रणबीर आणि आलिया कॅमेऱ्यासमोर येणार अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवरीच्या गेपअपमध्ये रानू मंडलने गायलं गाणं; व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरेना

भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”

“स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात”

Jayashree Patil | गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार