“येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची नशिबी येणार नाही हे मात्र नक्की”

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांच्या अटकेनंतर वादंग वाढला आहे.

उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यानिमित्त भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही, ती लोकं कुठंही राजकारण करतात, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

निवडणूक व्हायच्या अगोदर काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, आम्ही काय येऊन देतो का?, असं म्हणत पवारांनी फडणवीसांवर टीका केली होती.

त्याला आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून त्यांनी पवारांना चिमटे काढले आहेत.

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, मी येऊ दिलं नाही, असं शरद पवार म्हणाले होते. येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असं खोचक ट्विट सदाभाऊंनी केलं आहे.

दरम्यान, सदाभाऊंच्या या ट्विटवर आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अमेरिकेच्या विमानावर चीनचा झेंडा लावून रशियावर हल्ला करा”

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर

“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”