…अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा- शिवसेना

मुंबई |  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात चीनशी कोणी लढायचे? या मथळ्याखाली आज अग्रलेख लिहीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोले लगावले आहेत. तर काही प्रश्न देखील विचारले आहेत. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“एका बाजूला चर्चेचे नाटक करायचे व दुसऱ्या बाजूला सीमेवर युद्धाच्या तोफा धडधडत ठेवायच्या हे चीनचे धोरण नवे नाही. गलवान खोऱ्यातून सैन्य-माघारीचे नाटक करायचे व दुसऱया बाजूला डेपसांग पठारावर सैन्य घुसवायचे. डेपसांगमधून मागे हटायचे व अरुणाचलमध्ये घुसायचे. हिंदुस्थानला चर्चेत ठेवून हवे ते घडवायचे ही चीनची नीती आहे. अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा. तसा तो उभा राहिलेला दिसत आहे.”

“हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. काँगेस पक्षाच्या राजीव फाऊंडेशनला कोणत्या देशातून पैसे मिळाले यावर भाजपने यापूर्वी अनेकदा चर्चा केल्या. त्यात नवीन काय? आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे.”

“हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!”

 

-आत्महत्येनंतर सुशांतचे इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल ‘इतके’ लाख फॉलोअर्स

-राज्यात १ जुलैपासून….. कृषीमंत्री दादाजी भुसे यांची महत्त्वाची घोषणा

-“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही आम्हाला मार्गदर्शक”