“हिंदूंना शिव्या देणं आणि मुस्लिमांचं लांगुनचालन करण्याचं काम काँग्रेस करत आहे”

नवी दिल्ली | फक्त भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षानंं सत्तेत येण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. यावर चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागतली पाहिजे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

हिंदूंना शिव्या देणं आणि मुस्लिमांचं संतुष्टीकरण करण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपलं नाव इंडियन नॅशनल काँग्रेसऐवजी मुस्लिम लीग काँग्रेस करावं, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे.

एका धर्माच्या संतुष्टीकरणासाठी दुसऱ्याला शिव्या घालण्याचं काम आम्ही केलं नाही. फक्त सत्तेसाठी काँग्रेसनं मुस्लिमांवर प्रेम केलं असल्याची टीका पात्रा यांनी केली आहे.

दरम्यान, हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम, काँग्रेस हेच करत आलं असल्याचं, पात्रा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तान्हाजींच्या ‘गोडवली’ गावचा चित्रपटात उल्लेख नाही; चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

-रोज 3GB डाटा सोबत फ्री कॉलिंग; पाहा कोणत्या कंपनीनं आणले हे धमाकेदार प्लॅन

-अखेर महाराष्ट्रात तान्हाजी चित्रपट करमुक्त; सरकारचा निर्णय

-येवले चहाला FDA चा दणका; चहामध्ये आ़ढळली भेसळ

-लज्जास्पद! शिक्षकानेच १२ वीच्या विद्यार्थीनीकडे केली शरीरसुखाची मागणी