मुंबई | मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. यावेळी राज यांनी संजय राऊतांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.
‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल, असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता.
राज यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. आता पुन्हा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राऊतांवर निशाणा साधला आहे.
जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात. काहींना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात. या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, अशी टीका संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता केली आहे
संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. राऊत आता या टीकेला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राऊत यांनी राज यांच्यावर खोचक टीका केल्यानंतर राज यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
जेल मध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहीना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेल मध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 13, 2022
महत्वाच्या बातम्या-
“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”
पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान
“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली”
“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?”
राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले “संजय राऊतांनी….”