वांद्रेची घटना सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडवली गेली- संजय राऊत

मुंबई | मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकावर हजारो कामगारांनी गर्दी केली होती. या घटनेवरून राजकीय वातावरणही चांगलं तापलं होतं. या घटनेसंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

वांद्रयाची घटना ही ठरवून झालेली होती. वांद्रेतील घटना राज्य सरकारला अडचणी आणण्यासाठी घडवून आणली गेली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

साधूच्या वेशातून जिहादी फिरताहेत असे मेसेज पसरवणारे कोण होते, ते आज पालघरच्या घटनेविषयी आकांडतांडव करत आहेत. त्यांना या घटनेचं दुःख कमी आहे. त्यांचं दुःख इतकंच आहे की, दुर्दैवानं दोन साधुंची हत्या होऊनही या महाराष्ट्रात दोन धर्मात तेढ निर्माण झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना पाच वर्ष राज्याचा कारभार करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला मिळवून दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सहकार्य केलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

-दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

-“सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करुन राज्याच्या हितासाठी सकारात्मक पाऊल टाका”

-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

-‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा