मुंबई | शिवसेनेनं साद दिली तर भाजपची दारं आजही खुली आहेत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. याचाच समाचार घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होतात, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे. ते मुंबईमध्ये एका मुलाखतीत बोलत होते.
बाळासाहेबांचे फोटो लावूनच भाजप पक्ष वाढला. आम्ही स्वतंत्र्यपणे लढलो असतो तर 100 च्या वर जागा जिंकल्या असत्या. जी भूमिका मिळाली आहे ती निभवा, असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मी फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधी पक्षाच्या अपेक्षा आहेत. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सेना-भाजपने एकत्र आवाज उठवलेला, आता बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकला” – https://t.co/wdSiRqN5LB @KiritSomaiya @uddhavthackeray @shivsena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
संजय राऊत माझे मित्र नाहीत, पण त्यांना ‘हा’ सल्ला देतोय- देवेंद्र फडणवीस – https://t.co/mZ4rTZ7tRs @rautsanjay61 @Dev_Fadnavis @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019
“अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा” – https://t.co/7eyU8eootA @PChidambaram_IN @nsitharaman #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 14, 2019