“इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है”

नवी दिल्ली | महाराष्ट्राने भीती मारली. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी संजय राऊत यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी अनेक किस्से सांगितले.

महाराष्ट्रात जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाने देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. महाराष्ट्रानंतर आता देशात सुध्दा अनेक ठिकाणी राजकीय परिवर्तनाला दिशा मिळू शकते. ही एक परिवर्तनाची सुरूवात होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास होता. शरद पवार यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात. हे त्यांनी उदयनराजे यांना सुध्दा दाखवून दिलं आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-