“भीमा कोरेगावचं सत्य बाहेर येईल म्हणूनच केंद्राने NIA कडे तपास सोपवला”

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास केंद्राने एनआयए कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. भीमा कोरेगावचं सत्य बाहेर येईल म्हणूनच केंद्राने एनआयएकडे तपास सोपवला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्र सरकारचे कृत्य संशयास्पद आहे. सत्य बाहेर येण्याच्या भीतीने केंद्राने घाईने NIA कडे तपास सोपवला. अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही, असं म्हणत पवारांनी भाजपला सरकारला सुनावलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशीच्या मागणीनंतर फक्त पाच तासात केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला, असं म्हणत एल्गार परिषदेसंदर्भातील खटले खोटे आहेत तसेच अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयए कडे सोपवण्याचा निर्णय निषेधार्ह आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, याची भाजपला भिती वाटते म्हणूनच त्यांनी एनआयएकडे तपास सोपववा, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“केंद्राचा ‘हा’ निर्णय घटनाबाह्य; केंद्र सरकारला कोणाला तरी वाचवायचंय”

-आधी आर. आर. आबा भिडेंना वाचवायचे अन् आता जयंत पाटील वाचवतात; आंबेडकरांचा गंभीर आरोप

-“शरद पवारांना आम्ही हनुमानाच्या ठिकाणी मानतो…. ते आमचं दैवत”

-ते जास्त पोहे खात होते म्हणून बांगलादेशी; भाजप नेत्याचं अजब तर्कट

-“सेना-भाजपद्वेषाचं मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे”