“काँग्रेस आणि राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा बघतायेत”

मुंबई | साहेबांना संरक्षण देताना नारायण राणेंनी जीवाची पर्वा केली नव्हती, असं म्हणत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना टोला लगावला आहे.

तुम्ही ईडीचा जरूर बाहेर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत जनतेचे प्रश्नही मांडा. ईडीचं काय वाकडं होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकाऱ्यांचं जे झालं तेच आत्ता होणार आहे. आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे, असंही ते म्हणाले.

सध्या जी समाजकारणाची नवी पद्धत पहावयास मिळत आहे, ज्याला आपण सुडाचं राजकारण म्हणू शकतो. आम्ही कुणाशी भांडत आहोत; आपल्याशीच. काँग्रेस आणि राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा पाहत आहे. अजितदादा पवार वगळता या विषयावर कुणी भाष्य केलंय हे ऐकण्यात किंवा वाचण्यातही आलेलं नाही. गोरगरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीच पाडापाडी करत आहोतं. अश्याने साध्य काय होणार?, असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता. नारायण राणेंचे व्यवसाय कोणते? कुणी किती कष्टाने कमाई केली हे संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाची पर्वा केली नव्हती हे तुम्ही विसरलात का?, असंंही शिवाजी माने म्हणालेत.

मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती. त्यात राणेही होतेच. ऊगाच शिळ्या कढीला ऊत का आणत आहात? दत्ता सामंतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसा. कोण कोण गुन्हेगार आहेत आणि कोणी गुन्हा करण्यास मदत केली, ते सर्व बाहेर येईलं. शेवटी तुम्ही आम्ही सर्वच जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झालो आहोत. हे विसरून चाललोत हे मात्र नक्की, असंही त्यांनी म्हटलंय.

फाटक्यांचं राज्य कधी येणार? त्यांचं स्वप्न कधी पुर्ण होणार? एक गोष्ट विसरू नका. मुबंईला वाचवणारी मंडळीच आपआपसात भिडते आहे आणि ती कशी संपेल याचीच वाट आता काँग्रेस पहात आहे, असंही शिवाजी माने म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे” 

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना

  ‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’

  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका