जनतेचा आवाज ऐकायचा नसेल तर यात्रा कशाला काढता?? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर बाण

जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेप्रसंगी त्यांच्या ताफ्याला पूजा मोरे या स्वाभिमानाच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावरच शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेचा आवाज ऐकायचा नसेल तर यात्रा कशाला काढता? असा संतप्त सवाल शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवून पूजा मोरे जाब विचारण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र त्याअगोदरच पूजा यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, लोकशाही कार्यपद्धतीत सत्ताधाऱ्यांना अशा प्रकारचं वागणं शोभत नाही, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-