सरकारच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही…..; पुजाचा एल्गार!

जालना : मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या विरोधात एल्गार केलेल्या आणि मुख्यमंत्री गो बॅक असा नारा लावलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुजा मोरे यांनी विद्यमान भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच या हिटरशलाही सरकारच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पूजा मोरे यांनी दिली आहे.

मी आणि माझं संपूर्ण कुटुंब गेल्या 4 दिवसांपासून दहशतीच्या छायेत वावरत आहोत. सरकारने आम्हाला दिवसांपासून खूप त्रास दिलाय. माझ्या कुटुंबाला सत्ताधाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं, असं पूजा मोरे यांनी सांगितलं आहे.

मी जर धर्मा पाटलांची नात असते तर त्या माझ्या आजोबाला न्याय कसा देऊ शकले असते??, असा भावनिक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पूजाने महाजनादेश यात्रेप्रसंगी जालना-राजुरा रोडवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

महत्वाच्या बातम्या-