मुंबई | काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत (Lok Sabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आता यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
शिवसेनेनं राहुल गांधींच्या भाषणावर टीका करणाऱ्या भाजपला देखील अग्रलेखातून सुनावलं आहे. विरोधकांच्या भाषणावेळी पंतप्रधानांनी उपस्थित राहावं असे संकेत आहेत. पं. नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळ्यांनीच ही परंपरा पाळली आहे. अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे पं. नेहरूंनी कौतुक केलं आहे. बॅ नाथ पैंच्या भाषणावेळीही नेहरू हजर राहात. मधू लिमये, मधू दंडवते यांच्या भाषणात सत्तापक्षाने व्यत्यय आणला नाही, असं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलंय.
मोदी इंदिरा गांधी सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिरा गांधी लगेच मोदींना चिठ्ठी पाठवून भाषणाचं कौतुक करत असत. आता ते दिलदारीचं वातावरण संपलं आहे. राहुल गांधींच्या भाषणावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छेतेच्या भाषेत टीका केली आहे, असं राऊतांनी म्हटलं.
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाविषयी शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. 2014 साली देश निर्माण झाला असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलंय.
माझे पणजोबा देशासाठी 15 वर्ष तुरुंगात होते, माझ्या आजीने देशासाठी शरीरावर 35 गोळ्या झेलल्या. माझे वडील देशासाठी हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? असा तीर राहुल गांधींनी सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले, असंही ते म्हणाले.
चीनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनी एजंट ठरवणं म्हणजे राज्य करणं नव्हं. राहुल गांधींनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचं टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच, असा टोला देखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.
देशातील जनतेचे 15 हजार कोटी रुपये मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी करण्यासाठी वापरलं, ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह आहे. पण विरोधकांना यावर संसदेत बोलू दिलं जात नाही. सरकारच्या देशद्रोहावर बोलणं म्हणजेच देशद्रोह असा नवा फंडा तयार झाला आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बड्या अधिकाऱ्याचा सर्वात धक्कादायक खुलासा!
मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस
टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं
“मला फक्त मुंबईत येऊ द्या, मग मी बघतो काय करायचं ते”
“देशात पाॅर्न इंडस्ट्री बनू नये, तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर…”