अहमदनगर | केंद्रिय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत हरियाणासह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. आता 1 महिना महाराष्ट्राचा राजकीय माहोल गरम असणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली. जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमध्ये बोलताना पवार चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
आपण मावळतीचा इतिहास बघणारे नाहीत तर उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत हे विसरून चालणार नाही. अनेकजण आपल्याला सोडून गेले त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असं पवार म्हणाले.
नगरसारखा जिल्हा हा शेतीप्रमाणे शिक्षणातही पुढे आहे. मात्र आज त्यांना नोकऱ्या कुठेही मिळत नाही. ही सत्ता आमच्याकडे आल्यास रोजगारात देशातील क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे कौतुक होईल यात शंका नाही, असंही पवार म्हणाले.
प्रतिगामी विचारांची, जातीयवाद निर्माण करणारी, काळ्या आईचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी भाजपा आणि तत्सम संघटनेला चले जाव सांगण्याचे काम आपण करायचे आहे, असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीला आगामी काळात सत्ता देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या-
प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार!- https://t.co/5kkRsBp2Tv #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार- देवेंद्र फडणवीस- https://t.co/L2HfoVl6ke @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
…म्हणून शिवसेनेच्या वाघाची शेळी-मेंढी झालीय- नारायण राणे- https://t.co/bdwOrtciKT #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019