अहमदनगर | काही पौराणिक दाखले देत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज काही नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं काय भांडवल करता?, असं ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे. एका शैक्षणिक संकुलाच्या कार्यक्रमात माई बोलत होत्या.
इंदोरीकर महाराजांचं कार्य महान आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभीमानाने जीवन जगण्याचा मुलमंत्र दिला आहे. त्यामुळे त्यांनी आपण चुकलो म्हणत आपलं कार्य सुरू ठेवावं, असं सिंधुताईंनी सांगितलं आहे.
टीकाकाऱ्यांनीही महाराजांच्या शब्दांला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेवून वाद मिटवता घ्यावा, असं सांगत ताईंनी राज्यात सुरू असलेल्या वादाबद्दल खंत व्यक्त केली.
दरम्यान, प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेल्या चांगल्या कष्टावर पाणी फिरवायचं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी टीका करणाऱ्यांना विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होणार”
-दाणादाण उडालेल्या दिल्ली काँग्रेसची धुरा आता ‘या’ महिल्या नेत्यावर?
-“फक्त महाराजांनी नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील माफी मागितली पाहिजे”
-इंदोरीकरांना वाचवणाऱ्या राजकीय नेत्यांना तुम्हाला मंत्रालयात कोंडून घेईन- तृप्ती देसाई
-…. तर इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू- तृप्ती देसाई