“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

पाटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा, अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.

चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिलंय.

शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं.

दरम्यान, अखेरच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते.

महत्वाच्या बातम्या-

-देशात कोरोनाचा हाहाकार, रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ

-“उद्धव, मुलायम, धिरूभाई… घराणेशाही कुठे नाही?”

-पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

-सुशांतच्या आत्महत्येने शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला….

-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर