हिंगोली : महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होत्या.
सध्या स्थितीत राजकारणात झालेला चूकीचा द्दष्किकोन बदलवायचा असून त्यासाठी आगामी निवडणुकीत चांगले उमेदवार दिले जातील, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
स्वत:च्या संस्था, कारखानदारी राखण्यासाठीच केवळ राजकारणाचा उपयोग केला जातो हा जनतेचा झालेला द्दष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
कोणतीही संघटना पैशाने नाही तर कार्यकर्त्यांनी तयार होत असते. त्यामुळे निवडणुकीत कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची असते. निवडणुकीत विरोधी उमेदवार कसा वाईट आहे, सांगून मतदान मागण्यापेक्षा आपल्या उमेदवाराचं कर्तुत्व सांगून मतदान मागावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, शासनाने जाहिरातीवर होणारा करोडो रूपयांचा खर्च कमी करून शिक्षण, आरोग्य, रस्ते अशा विकासकामांवर खर्च केल्यास जनतेला आंदोलनं करण्याची गरज राहणार नाही, असही सुळे म्हणाल्या.
…तर माझं नाव बदला; खासदार अमोल कोल्हेंचं खुलं आवाहन- https://t.co/4Sf3oHGAIJ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
“देवेंद्र फडणवीस हेच शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे खरे वारसदार”- https://t.co/hQehM3iGmv #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास आठवले यांचं मोठं भाकीत; म्हणतात…- https://t.co/1agh1nceCj
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019