आपल्या जिद्दीच्या जोरावर ‘या’ खेळाडून टीम इंडियात मिळवलं स्थान!

मुंबई : काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वतीनं बांग्लादेश विरोधात होणाऱ्या एसीसी एमर्जिंग कपसाठी  संघाची घोषणा केली. या संघात केरळच्या 20 वर्षीय फलंदाज मिन्नू मणि हिची महिला संघात निवड करण्यात आली आहे. मिन्नू डाव्या हाताची फलंदाज असून, पार्ट टाईम फिरकी गोलंदाजही आहे. याशिवाय मिन्नू एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षकाही आहे.

मिन्नू अंडर 23 एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळली होती. या स्पर्धेत मिन्नूनं 188 धावा केल्या होत्या, त्याचबरोबर 11 विकेट घेतल्या होत्या. यंदा मिन्नूची केरळ क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ज्युनिअर क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देण्यात आला होता. तिच्या कामगिरीच्या जोरावर मिन्नूला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. 

मिन्नू वायनाडच्या कुरिचिया या आदिवासी जमातीतील आहे. मिन्नूचे वडील मजूर असून घरची परिस्थितीही हालाकिची आहे. त्यामुळं 20 वर्षांच्या मिन्नूला क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना गयावया करावी लागली होती.

दरम्यान मिन्नूच्या घरच्यांनी सर्वात वाईट काळ पाहिला तो गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या पुरात. केरळमध्ये आलेल्या पुरात मिन्नूचे घर वाहून गेले होते. त्यावेळी पैसे जमवून त्यांनी घर पुन्हा उभे केले. त्यानंतर मिन्नूनं पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 

मिन्नूसाठी क्रिकेट हेच जीवन होते, त्यामुळं तिनं कधी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही. त्यासाठी मिन्नूला मनथवाडी येथील सरकारी शाळेत दाखल करण्यात आले. या शाळेत मिन्नूला क्रिकेटचे खरे धडे मिळाले. मिन्नूला शालेय दिवसात एलसम्मा अनमोल बेबी या क्रिकेटरनं ट्रेनिंग दिली. त्यानंतर मिन्नूला ओपन ट्रायल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दाखल करण्यात आले. तेथे मिन्नूची निवड झाली, त्यानंतर तिनं मागे वळूण पाहिले नाही. 

महत्वाच्या बातम्या-