राक्षसी महत्त्वाकांक्षेतून स्थापन झालेलं सरकार म्हणत आदित्य ठाकरे आक्रमक, म्हणाले…

मुंबई | शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार पाडल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात तुफान खडाजंगी सुरु आहे. शिवसेेनेचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे बंडखोर आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

शिवसेनेतील ही फक्त गद्दारी नाही तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. काल मानखुर्द येथे झालेल्या शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी जनतेशी संवाद साधला.

शिवसेना सोडून बंड केलेल्या लोकांबद्दल मला राग नाही किंवा शिवसैनिकांवर देखील माझा राग नाही. मात्र ज्यांनी यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्यासोबतच दगाबाजी केल्याचे दु:ख आहे.

शिवसेनेतून बंड करुन गेलेले 40 आमदार राज्यात कुठेही फिरले, तरी लोक यांना गद्दार म्हणूनच ओळखणार आहेत. यांच्यापैकी कोण्याच्याही अंगात राजीनामा देण्याची हिंमत नाही आणि हे 40 लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यातील दोन लोकांच्या सरकारवरुन त्यांनी एकनाथ शिंदे सरकारला घेरले. राज्यात दोन लोकांचे जंबो कॅबिनेट सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या लांबलेल्या खाते वाटपावर देखील त्यांनी शिंदे सरकारला कात्रीत पकडले.

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात अनेक कारणांवरुन वाद आहेत. आणि हे वाद न्यायालयाच्या दरबारात न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याबद्दल देखील आदित्य ठाकरे बोलले. कायद्याप्रमाणेच शिवसेनेची बाजू मजबूत आहे, असे ठाकरे म्हणाले.

त्याचप्रमाणे राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आले आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असा दावा यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. विधानसभेच्या अधिवेशनात हे सगळे 40 गद्दार, आरोपीप्रमाणे आले आणि आम्ही 14 लोक स्वाभिमानाने बसलो होतो, असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”