“हे संकट देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे, या संकटात राजकारण करणं गैर”

नवी दिल्ली | आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत.

एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

सध्या देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. या संकटात राजकारण करणं गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाची स्थिती ही गंभीर आहे. मात्र आपण कोरोनाचा सामना नेटाने करतो आहोत. आपल्या देशाने बरंच नियंत्रण मिळवलं आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ दोन्ही लढाईतही आपणच जिंकू – नितीन गडकरी

-फेसबुकसोबत करार होताच जिओनं केला हा कारनामा!

-राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स; पुण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

-‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

-डॉक्टरांवर हल्ला केल्यास होणार अजामीनपात्र गुन्हा दाखल; मोदी सरकारचा मोठा निर्णय