श्रीगोंद्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तीन मित्रांचा जागीच मृत्यू

अहमदनगर | श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकून तिघांचा मृत्यू झाल्यानं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांना धक्का बसला आहे.

राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस हे तिघेजण कारमधून प्रवास करत होते. मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ ऊसाच्या ट्रेलरला धडक दिल्यानं अपघात झाला.

ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळतात अनन्या हॉटेलमधील व्यक्तींना घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढलं. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आलं.

तातडीनं रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या- 

Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स 

बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल 

राष्ट्रवादीला मोठा झटका; मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसने घेतला बदला 

मोठी बातमी! बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, धक्कादायक माहिती समोर 

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढलं