मुंबई| संजय राऊत आमच्या घरातला माणूस आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. सामनातील भाषा ही आपली पितृभाषा आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अनपेक्षित आली. सामना, शिवसेना आणि ठाकरे ही तिन्ही नावं वेगळी होऊ शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे गेली, तरी ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत आमच्या घरातले आहेत. संपादकीय विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहील असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी येत्या सात मार्चला अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावं. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असं आवाहनही यावेली केलं मुख्यमंत्र्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे बंधू आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर भाष्य करण्यास नकार दिला.
“येत्या ७ तारखेला मी अयोध्येला जातो आहे, राम मंदिरात जातोय, श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. हे मी एका श्रद्धेने करतोय, एका भावनेने करतोय.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/w5aC6xSXVH— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर
-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर
-देशात शांतता आणि एकता गरजेची आहे- पंतप्रधान
-मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांच्या वक्तव्याने मुस्लिम आरक्षण जाहीर करणाऱ्या नवाब मलिकांची गोची!
-मुस्लिम आरक्षणावर आमच्यात आणखी चर्चा झाली नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य