मुंबई | बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा नको. तर मरेपर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा मिळायला हवी, असं मत जेष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी मांडलं आहे. सध्या देशात बलात्काराच्या घटनांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यावर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
बलात्कारासारख्या अतिशय अमानुष कृत्याला माफी कधी दिली जाऊ नये. मात्र कुणालाही कुणाचाही जीव घेण्याचा हक्क नाही. हे लक्षात घेता बलात्कार करणाऱ्यांना कायमस्वरुपी तुरूंगात डांबणं गरजेचं आहे, असंही वहीदा रहमान म्हणाल्या.
हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर संपूर्ण देश हळहळला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या सगळ्या प्रकरणावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. वहिदा रहमान यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, वहिदा रहमान समाजात घडणाऱ्या घटनांवर आपलं परखड मत मांडत आसतात. हैदराबाद प्रकरणावरही त्यांनी बलात्काऱ्यांना फाशी नको. तर मरेपर्यंत जन्मठेप द्या, असं मत मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री व्हावेत; भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांची इच्छा – https://t.co/FG90nb60dt @ChhaganCBhujbal @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019
“रोहिणी खडसेंचा पराभव करणाऱ्यांविरोधातले पुरावे घेऊन मी दिल्लीत आलोय” – https://t.co/FEsWQQNNkT @EknathKhadseBJP @Rohini_khadse
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019
मला उपमुख्यमंत्री करावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा- अजित पवार – https://t.co/0pt819lQUo @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019