मुंबई | नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
ज्याने आयुष्यभर ठेकेदारी केली. दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांच्या कृपेने मिळाले, असंही राऊत म्हणाले.
नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसं फसवलं, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळ सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नाही, असं म्हणत विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, आघाडी सरकारने मागच्या 10 दिवसात फक्त मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचं काम केलं आहे. म्हणून मी या सरकारचं नाव स्थगिती सरकार ठेवलं आहे, असं नारायण राणे यांनी दुपारी म्हटलं होतं. त्यावर विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही; उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा निर्णय – https://t.co/pRdaF5Yrmy @myogiadityanath #UnnavCase
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 8, 2019
‘जीएसटी’त मोठे बदल, जीवनावश्यक वस्तू महागणार? – https://t.co/Gtmd5f5gVY #GST
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 8, 2019
‘जीएसटी’त मोठे बदल, जीवनावश्यक वस्तू महागणार? – https://t.co/Gtmd5f5gVY #GST
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 8, 2019