“सचिन वाझे लादेन आहे का असं म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही”

मुंबई |  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौ.कशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे लादेन आहे का?, असा सवाल करणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, असे प्रश्न निलेश राणे यांनी केले आहेत. त्याचबरोबर आतंकवाद्यांच्या वस्तू घेऊन पोलिस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

मिडीया रिपोर्टनूसार सचिन वाझे यांनी मुकेश आंबानी यांच्याकडून शिवसेनेला पैसे काढायचे होते, असं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा की शिवसेना या क्राईममध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तिथे संपूर्ण सत्य काय आहे हे बाहेर पडणार नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी देखील निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी नारायण राणे यांनी केली. यासंदर्भात राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसेच सचिन वाझे ओसाना बीन लादेन आहे का, असा शब्दप्रयोग विधानसभेत आणि परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! नागपूरात ‘या’ तारखेपर्यंत केलं लॉकडाऊन जाहीर