सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!

मुंबई | सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक दिगज्जांवर सुशांतच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. सुशांत नियमितपणे लिहीत असलेल्या त्याच्या डायरीतून काही महत्वाची पाने फाडली गेल्याचं आता समोर आलं आहे. सुशांतच्या या डायरीमुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला नविन वळण मिळालं आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आणि सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी सुशांत नियमितपणे डायरी लिहीत असल्याची माहिती दिली होती. या डायरीमध्ये सुशांत दैनंदिन जीवनात घडत असणाऱ्या गोष्टी आणि भविष्यातील स्वप्न लिहीत होता. सुशांतच्या डायरीमुळे अनेक खुलासे होऊ शकतात, असंही विकास सिंह यांनी सांगितलं होतं.

सुशांतच्या आत्महत्येनंतर ही डायरी मुंबई पोलिसांकडे होती. ही डायरी आता सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीतील काही महत्वाची पाने फाडल्याचं सीबीआयच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना सुशांतच्या चार डायऱ्या मिळाल्या होत्या. सुशांतच्या या डायऱ्यांमधून पोलिसांना बरीच माहिती मिळाली होती. सुशांत या डायरीमध्ये आपल्या आर्थिक नोंदीही ठेवत होता.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या नवऱ्याला एक कोटी तर दुसऱ्याला 45 लाखाचा गंडा घातला अन् परदेशात तिसऱ्या सोबतच तिचा संसार थाटला

एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; साखरझोपेत असताना 3 सख्ख्या भावांचा सापानं केला घात

संतापजनक! निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; शारीरिक सबंध ठेवायला विरोध केल्याने 12 वर्षीय मुलीच्या गुप्तांगात….

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने सामूहिक आत्महत्या करणाऱ्या त्या प्रकरणाला आला नविन ट्विस्ट

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!